Skip to main content

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे.

"छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "

                बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.
                      दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शाहु महाराज यांनी म्हटले आहे ," तुम्ही ताबडतोब मजल   दरमजल बादशहाचे कुमकेस जावे.पुर्वी आमचे वचन औरंगजेब पातशहांशी गुंतले आहे की परचक्र आले तर आम्ही तुमची कुमक करावी .होईल तेथपावेतो सर्वस्वे साह्य करावे ."
                  मोगल बादशाही संकटात सापडली की आपण तिच्या साह्यास धावून जाऊ ,  हे औरंगजेबास दिलेले वचन तो मेल्यानंतर तीस वर्षांनी हा मराठ्यांचा राजा स्मरत होता व त्यानुसार आपल्या पेशाव्यास हुकूम करत होता ! आदिलशाही अथवा मोगलशाही संकटात येणे हीच आपली सुवर्णसंधी मानणाऱ्या शिवछञपतींच्या स्वर्गस्थ आत्म्यास या वेळी काय बरे वाटले असेल !
                       याच सुमारास आणखी एक पञ उपलब्ध आहे .हे पञ पेशव्याचा सातार्यातील शाहु महाराजांजवळचा हस्तक मल्हार तुकदेव पुरंदरे याने लिहिले आहे .त्यामध्ये मोगल बादशाहीसंबंधी महाराजांचे विचार त्याने उद्धृत केले आहे . तो लिहितो , " महमंदशहाची पातशाही गेली होती ती ईश्वरे कायम राखली. त्यास आपण राजकारण राखून अमीरूल - उमरा यासारखे व्हावे. पोटास व फौजांस लागेल ते आम्ही पातशाही माल पैदा करुन त्यातून घेऊ.उरला पैका ( पातशाही ) खजाना दाखल व्हावा किंवा फौजांस ( जहागिर्या ) आलाहिदा मागाव्या आणि सर्वास राजी करुन द्यावा , हा लौकिक मोठा . कैसा म्हणाल तरी जीर्णोद्धार देवालयाचा केल्यास नवीन लिंगाच्या स्थापनेपेक्षा अधिकोत्तर आहे .महमंदशहाचे पातशाहीचा बंदोबस्त केल्यास लौकिक मोठा .मोडून टाकण्यात लौकिक नाही . दुसरी गोष्ट हजारो चोरपोर खातील आणि पातशाही मोडल्याचा दोष आल्यावर दुसरे राजश्री छञपती स्वामीही पातशाही इच्छित नाही .जीर्णोद्धार केल्यास संतोष मानतील.
                          वरील पञातून शाहु महाराजांची दिल्लीच्या तख्ताविषयी कोणती मानसिकता होती , याची स्पष्ट कल्पना येते.कुठे आदिलशाहाचेच नव्हे तर दिल्लीचे तख्त काबीज करुन अखिल हिंदुस्थानात ' हिंदवी स्वराज्य '  पसरवण्याचे स्वप्न पाहणारे शिवछञपती आणि कुठे दिल्लीच्या तख्ताचे,संरक्षण करण्यात धन्यता मानणारे , नव्हे ते मोडून टाकण्यात दुर्लौकिक आहे , असे मानणारे त्यांचे नातू शाहु महाराज !  शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांच्या समोरची आव्हाने बिकट होती ; परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती , त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वभौम मराठी सत्तेची स्थापना केली ;आणि येथे शाहु महाराजांच्या काळात दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी प्राप्त होत असताना त्यांना त्या तख्ताचा देवालयाप्रमाणे जीर्णोद्धार करावा , असे वाटवे , ही खरी पेशवाईतील मराठ्यांच्या राजनैतिक इतिहासाची शोकांतिका होती . शाहु महाराजांना शिवाजी समजलाच नाही , हे खरे !

#मराठीशीहीचे_अंतरंग
#डॉ_जयसिंगराव_पवार
#वैभव_चौधरी

Comments

Popular posts from this blog

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...