Skip to main content

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर
तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा
तेवढंच देवाला पुण्य...
    देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना स्वतःच भविष्य माहीत नाही ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार..ज्याचा स्वतःच्या मनगटावर विश्वास नाही ते असले फालतु उद्योग करतात. तुमचा विश्वास असुद्या पण अंधविश्वास नसुद्या...  तसे पण आता देवाचे, देवाच्या नावावर फसवून पैसे उकळणार्या बुवा-बाबाचे दिवस संपले आहेत किंबहुना ते संपत आले आहेत. देवा काहीतरी कर तुझं अस्तित्व धोक्यात आहेत. तु काहीच करू शकत नाहीस याच्यावर माझा विश्वास आहे..मला कुणाच्याच मनातल्या श्रध्दा/भावना दुखवायच्या नाहीत... हे माझं व्यक्तीत मत आहे....
      तुम्हाला देव भेटला तर मलाही सांगा? माणसाला देव मानू नका किंवा देवाच्या रूपानं माणूस धावून आला असंही म्हणू नका. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर माणसा सारखंच वागा.त्यामुळे माणसाला देव बनण्याचा किंवा देव बनविण्याचा प्रयत्न करून नका.माणुसकीचा धर्म पाळा...
     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीत खूप सुंदर आहे. माणसाने कसं वागलं पाहिजे ते ह्या गीतात सांगितले आहे.किंवा माणूस कसा असला पाहिजे हे या गीतात सांगितले आहे. मंगेश पाडगावकर यांनी हे गीत लिहले आहे.
      ज्ञान बनो कर्मशील , कर्म ज्ञानवान
   
      पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान
      ज्ञान बनो कर्मशील , कर्म ज्ञानवान.
      जातीभेद ,वंशभेद , धर्मभेद दूर
      लाख लाख कंठातून हाच एक सूर
      करुणेच्या चरणांशी नत हो विज्ञान.
      माणुसकी धर्माचा अंत जाणतो
      श्रम निष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो
      हृदयातून समतेचा निर्भय अभिमान.
       सेवेतेच मुक्ती ही मंगल दीक्षा
       न्यायास्तव जागृतीही सत्व परीक्षा
       हे विश्वची घर अमुचे मंत्र हा महान.
            - मंगेश पाडगावकर
         
  चला आता माणूस बनू यात. दान पेट्या भरून आपली आमदनी वाढणार नाही ती कमी होणार आहे...हे गीत ऑडिओ स्वरूपात एकदा ऐका...नक्कीच देव सापडले(माणसात)
         

वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...