Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

देश भक्त कोण ! गांधी का गोडसे ? - वैभव चौधरी

अरे वा प्रज्ञाजी !! Bjp ने जनतेला 2014 मध्ये सांगितले देश काँग्रेस मुक्त करायचा आहे. पण हिने तर आता नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणून दाखवून दिले की bjp ला देश काँग्रेस मुक्त नाही तर गांधी मुक्त करायचा आहे. त्यांना सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या विचारसरणीचा नाश करायचा आहे.वारंवार बोलले जाते की संघाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग न्हवता आणि हे ऐतिहासिक सत्य आहे हे कोणी डावलू शकत नाही. त्यामुळे संघाला स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणीच (नेहरु-गांधी) नष्ट करायची आहे.गोडसेनी कुठल्या दहशदवादीचा खून नाही केला . त्याने महात्मा गांधींच्या खून केला आहे. ज्या गांधीने स्वतः देशाचे नेतृत्व केलं अशा महान व्यक्तीचा खून केला. गांधींजींची देशभक्ती , हिंदुत्व भक्ती गोडसे पेक्षा कमी होती काय ? जे गांधी संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करत होते त्यांची ह्या देशद्रोही नथुराम गोडसेनी हत्या केली. स्वतंत्र भारतातला नथुराम गोडसे हा पहिला हिंदू देशद्रोही होता. संपूर्ण देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करत होता, देशासाठी स्वतःच जीवन पणाला लावून लढत होता आणि हा संघ परिवार हिं...

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही.- एक समीक्षा

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही. उलट जे स्वत:ला संघाचे विरोधक समजतात, ते संघाचे प्रचारक असतात. संघाच्या प्रचारकापेक्षाही ते जास्त काम करतात. संघाचा सामान्य स्वयंसेवक असामान्य काम करतो, याचा विरोधक अनुभव घेत असतात. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम संघ करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष संघ देतो. छत्रपती शिवरायांचे अधुरे स्वप्न, हिंदू समाजाचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि भक्तिभाव जागवण्याचे काम संघ करतो. #माझे_मत👇#आणि_काही_प्रश्न        संघ कुणाचा विरोधक नाही मग संघटना कशासाठी उभी करत आहे.संघाला म्हणजे हिंदू धर्मियांना आता कशाची भिती आहे. का म्हणून संघटना उभी करत आहे, त्याची शाखा वाढवत आहे. संघाचा स्वयंसेवक असामान्य काम करतो म्हणे - असे कुठले काम फक्त संघाचा स्वयंसेवकच करतो इतर भारतीयांना ते जमत. असं कुठलं काम माझ्या अजून ऐकण्यात नाही. किंवा फक्त संघावालेच असामान्य आहे बाकीचे सगळे सामान्य आहेत . असं म्हणायचं आहे का संघाला. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात ...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...