Skip to main content

देश भक्त कोण ! गांधी का गोडसे ? - वैभव चौधरी

अरे वा प्रज्ञाजी !!
Bjp ने जनतेला 2014 मध्ये सांगितले देश काँग्रेस मुक्त करायचा आहे. पण हिने तर आता नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणून दाखवून दिले की bjp ला देश काँग्रेस मुक्त नाही तर
गांधी मुक्त करायचा आहे. त्यांना सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या विचारसरणीचा नाश करायचा आहे.वारंवार बोलले जाते की संघाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग न्हवता आणि हे ऐतिहासिक सत्य आहे हे कोणी डावलू शकत नाही. त्यामुळे संघाला स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणीच (नेहरु-गांधी) नष्ट करायची आहे.गोडसेनी कुठल्या दहशदवादीचा खून नाही केला . त्याने महात्मा गांधींच्या खून केला आहे. ज्या गांधीने स्वतः देशाचे नेतृत्व केलं अशा महान व्यक्तीचा खून केला. गांधींजींची देशभक्ती , हिंदुत्व भक्ती गोडसे पेक्षा कमी होती काय ? जे गांधी संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करत होते त्यांची ह्या देशद्रोही नथुराम गोडसेनी हत्या केली.
स्वतंत्र भारतातला नथुराम गोडसे हा पहिला हिंदू देशद्रोही होता.
संपूर्ण देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करत होता, देशासाठी स्वतःच जीवन पणाला लावून लढत होता आणि हा संघ परिवार हिंदू धर्माचे संघटनाचे काम करत होता. हि संघटना उभी करून संघाने  धर्माला माणसापेक्षा वर नेऊन बसवले. नथुराम गोडसे जर  भगतसिंग बरोबर देशासाठी फाशीवर चढला असता तर त्याला नक्कीच आम्ही देशभक्त मानला असता . पण हा तर देशद्रोही आहे. संघाने दाखवून द्यावे की संघ कुठल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होता .देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कुठल्या चळवळीत संघाची लोकं महात्मा गांधी बरोबर होती. संघाचा हा फालतू धार्मिकपणा खूप दिवस नाही टिकणार.
माणसाने स्वतःच्या जगण्यासाठी धर्माची निर्मिती केली पण या संघाने धर्मासाठी समाजात दंगली घडवल्या.
संघानं एक ध्यानात ठेवावं तुम्ही गांधीजींचे आणि नेहरूंचे विचार कधीच मारू शकत नाही.
गोडसे देशद्रोही होता , आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे.तथाकथित काही संघभक्तांना अशा वेळेस संविधानाची आठवण येते.  संविधानात सांगितले खून करणारा तर आरोपी असतो ? मग तुम्ही त्याला देशद्रोही कसा म्हणता ? मग
विमानात रात्रीचा प्रवास करून देशाचा पैसे वाचवणारा देशभक्त कसा होतो ?  पान खाऊन बसमध्ये थुंकणारा देशद्रोही होतो.दहशतवाद्या बरोबर लढताना स्वतःचा जीव गमवणारे हेमंत करकरे देशद्रोही ठरतात तर गांधींना मारून गोडसे सच्चा देशभक्त कसकाय होतो ?
जय हो ..

जय भारत
वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...