Skip to main content

देवावर रुसा रे कधीतरी !!

देवावर रुसा रे कधीतरी !!
 देवावर रागवा रे कधीतरी !!
 देवावर ओरडा रे कधीतरी !!
तो येतो का कधी धावून आपल्या
मदतीला.
एखाद्या मित्राने आपली मदत नाही केली
कि त्याच्यावर रुसून ,रागावून,
त्याला वाकडं-तिकडं बोलून
पार शिव्या देऊन मोकळं होणारे आपण.
देवावर रागावतो का कधी ? देवावर रुसतो का कधी ? देतो का कधी शिव्या देवाला?.
आपण मित्रांसोबत फक्त एवढंच करत नाही. आपण त्यांच्या बरोबर बोलायचं पण सोडतो.
पण आपण देवा बरोबर असं वागतो का कधी!
आपण देवाला शिव्या देतो का कधी !
तो तर कधीच आपल्या मदतीला धावून येत नाही,
तो आपल्याला कधी भेटायला सुद्धा येत नाही.
आपणच जातो झकमारुन त्याला भेटायला त्याच्या दारात!
म्हणजे बघा ना किती एटिट्यूड आहे देवाला.
इथं आपण आपल्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने आपल्याला एटिट्यूड दाखवला तर आपण लगेच बोलतो गेला उडत, तुझ्या सारखे लय पाहिलेत , काय गरज नाही तुझी.
मग देवाला का नाही म्हणत असं गेला उडत, काय गरज नाही तुझी, लय पाहिलेत तुझ्या सारखे. देव तर आपल्याला कधीच भेटत नाही, पण आपण करतो का कधी धाडस त्याला असं बोलण्याचं.का घाबरतो आपण त्याला येवढं काय माहीत.ना तो आपल्याला कधी भेटतो ,ना तो कधी आपल्या बरोबर बोलतो.आपण त्याला येवढं नारळ-बिरळ फोडतो, त्याला चांगला तुपाचा नैवेद्य देतो, पण तो साधा धन्यवाद सुद्धा म्हणत नाही आपल्याला. तो आपल्याला कवडीबद्दल सुद्धा विचारीत नाही.तरी आपण त्याच्या दारात कशाला काशी करायला जातो काय माहीत. पण आपण त्याला शिव्या कधीच देत नाही.त्याला वाईट कधीच बोलत नाही. त्याच्यावर आपण रुसत देखील नाही.खरं पहायला गेलं तर आपल्यातच दम नाही त्याला शिव्या द्यायला. त्याच्या बद्दल वाईट बोलायचं म्हटलं तर आपली तिथंच जाग्यावरच फाटते ,कशी , टररर......बरोबर ना. ज्याला स्वतःच्या जाग्यावरून उठता येत नाही, जो कुणासोबत बोलू शकत नाही, जो आपण त्याला दिलेला नैवेद्य सुध्दा खाऊ शकत नाही. ज्याला स्वतःच्या घरात चोरी झालेली सुद्धा कळत नाही. नदीला महापूर आल्यावर त्याला स्वतःला वाचवता येत नाही, त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना तो त्या महापूरापासून वाचवू शकत नाही. जो स्वतःच्या दारात उपाशी पोटी त्याच्या नावाने भीक मागणाऱ्यांना पोटभर खायला देऊ शकत नाही, ज्याच्या मंदिरात त्याच्या डोळ्यासमोर चार चार दिवस एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. त्या मुलीला सुध्दा तो वाचवू शकत नाही. अशा कर्तव्य शून्य , कार्य शून्य देवाला आपण घाबरतो.
                      थोड्या थोडया गोष्टींवरून आपण आपल्या मित्रमैत्रिणीनां , नातेवाईकांना मतलबी म्हणतो. त्याच्या सारखं ,तिच्या सारखं,त्यांच्या सारखं मतलबी,स्वार्थी या दुनियेत शोधून सुद्धा कोणी सापडणार नाही असं आपण म्हणतो.पण देवाला कधीच आपण मतलबी म्हणत नाही. आपण त्याला कधीच स्वार्थी म्हणत नाही.असं का बरं. आपला देव स्वार्थी नाही का ? तो मतलबी नाही का ?
 तो फक्त आपल्याकडून घेतो, त्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीच देत नाही.आपणच त्याला भेटायला जातो , तो कधीच येत नाही आपल्याला भेटायला.आपण त्याची आठवण आली की त्याच्या नावाचा जप करतो.पण त्याला येत असेल का आपली आठवण ? तो करत असेल का आपल्या नावाचा जप. मला तर पक्क माहीत आहे तो आपल्याला कुत्र्याबद्दल सुध्दा विचारत नाही. त्याच्या दारात सारखं सारखं जाऊन आपल्याला काही किंमतच राहिली नाही. आपण त्याच्या दारात गेल्यावर तो हसत असेल आपल्यावर , म्हणत असेल आली बावळाटं🤣😂😂.
                      साधंच उदाहरण घ्या कि.आपल्या घरातील एखादी व्यक्ती काम करत नसेल तर आपण त्याला जे नाही ते बोलतो. नुसताच आयतं खातोय असं म्हणतो. त्याला काय रोग आलाय काम करायला नुसतंच आयतं खातोय. फक्त एवढंच नाही तर त्याला ज्या शिव्या कधी कोणी ऐकल्या नसतील असल्या शिव्या देतो.पण आपण देवाला कधी असं काही बोलतो का ? देव करतो का कुठलं काम ? तरी आपण त्याला जाग्यावरच देतो ना सगळं. त्याला राहायला चांगलं भव्यदिव्य मंदिर बांधतो.त्या मंदिराला चांगलं सजवतो धजवतो. देवाचं कसं झालंय माहितेय का...तो बिनपगारी पण फुल अधिकारी झालाय.तो झालाय साहेब आणि आपण त्याचं सेवक. शिवाय तो अंगठा बहाद्दर.आपण तर त्याच्या पेक्षा जास्त शिकलेलो. आपण ग्रॅज्युएट आणि तो साधा बालवाडीत सुद्धा गेला नाही तरी  त्यो साहेब झालाय. तरी त्योच पावर मधी ! आपणच त्याच्याकडे जायचं, आपणच त्याच्या पाया पडायचं.आपण येवढ्या डिग्र्या घेऊन आपल्याला काही मानबीन हाय का नाय. देवाला विचारा बरं , देवा तुला माहितीय का अर्थशास्त्र  ? तुला माहितेय का भूगोल-बिगोल ? पर्यावरणशास्त्र , इतिहास, भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, जीवशास्त्र यातलं काहीतरी माहीत आहे का ? डॉक्टर-इंजिनीअर ,वकिल-बिकिल असलं काही माहीत आहे का तुला ? माहित असेल तर सांग ? आणि माहीत असलंच तर कसकाय माहीत आहे ते पण सांग. कोणत्या शाळेत शिकला ते पण सांग.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर तुझी पदवी दाखव म्हणजे डिग्री दाखव. मला माहित आहे येवढे प्रश्न विचारल्यावर तु बोलणारच नाही. तसं पण तुला बोलता येतं नाही आणि एवढे प्रश्न विचारल्यावर तर तु बोलणारच नाही.
                          म्हणून आत्ताच सांगतो मित्रांनो सांगा त्या देवाला.बाबा आता लय झालं तुझं. आम्ही काय तुझ्या पुढपुढं करायला मोकळे नाही.तुला काय आम्ही आता आयतं देणार नाही. एका जाग्यावर बसून तु आळशी झाला आहेस.तुझं तु काम कर आणि खा. तुझ्या देवळाचं तूच राखण कर. आणि तुला जो एटिट्यूड आहे ना तो तुझ्याकडेच ठेव. आम्हाला तुझ्या बरोबर बोलायचंही नाही आणि तुझ्याकडे यायचंही नाही. तुला आमची गरज असेल तर तु ये आमच्याकडे. नाहीतर तुझी आम्हाला गरज नाही. तु आला तर आला नाहीतर गेलास उडत. तुझी काही गरज नाही आम्हाला. कळलं का!


वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...