Skip to main content

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी

                    वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाचत होतो.या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे. या अनुभवकथनातील प्रत्येक लेख हा विचार करायला लावणारा आहे. याच पुस्तकातील ६ वा लेख आहे म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा.
                      या लेखातील काही भाग मी इथे आपणाला वाचण्यासाठी देत आहे.या लेखात सुधा मूर्ती आणि त्या म्हताऱ्या माणसांमध्ये झालेला सवांद अंतर्मुख करणारा आहे. विचार मग्न करायला लावणारा आहे.ज्या प्रकारे त्या माणसाच्या बोलण्यानं सुधा मूर्ती विचार मग्न झाल्या त्याच प्रकारे वाचक ही विचार मग्न होतो. सुधा मूर्ती ह्या ओडीसा राज्यातील आदिवासी भागातील एका खेड्यात भेट द्यायला जातात तेव्हा त्यांची त्या गावातील एका म्हाताऱ्याशी भेट होते. त्यांच्यात झालेल्या संवादातून असं कळतं कि भारत देश स्वतंत्र झाला आहे हे भारतातील काही आदिवासी भागातील लोकांना कित्येक वर्ष माहीत न्हवतं.याचं खुप वाईट वाटतं.
                      त्या महाताऱ्याची साधी राहणी, साधं वागणं, साधं बोलणं हे शिकलेल्या लोकांना अंतर्मुख करायला लावणारं आहे.या लेखातील तो संवाद मी जसा चे तसा देत आहे.
                      मला एक म्हतारा माणूस भेटला .मी म्हतारा म्हणते आहे खरी...  पण त्याचंसुद्धा वय नक्की किती असावं, ते सांगणं फार कठीण होतं.आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले, त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशे चार वर्ष असावं.
                      या म्हताऱ्याशी माझं संभाषण चांगलं रंगदार झालं. मी त्याला विचारलं, 'आपल्या देशावर कुणाचं राज्य आहे ?'
                      त्याच्या दृष्टीने 'देश' याचा अर्थ कलाहंडी (या शहरात तो राहत होता) एवढाच होता, हे उघडच आहे.
 त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला. 'तुम्हाला माहीत नाही ? आपल्या देशावर 'कंपनी सरकार'चं राज्य आहे.' त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता 'इस्ट इंडिया कंपनी.'  भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, याची त्या म्हताऱ्याला कल्पना न्हवती.
          मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोकचक्र दाखवलं.
          पण त्यांचा त्याच्यावर काही प्रभाव पडला नाही. ' हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे. त्याच्याकडे पाहून थोडीच कळणार आहे, आपल्यावर कुणाचं राज्य आहे ते ? आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे.'
          इंग्लंडची ती 'गोरिवाली राणी' आता परत गेली आहे व तिचं आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला, पण त्याला काही पटेना.
               आदिवासी जमातीमधे वस्तूंच्या दिवाणीघेवणाची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्वाची असते, याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला. 'हे पाहा, या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण, खूप खूप साड्या, मिठाची गोणी, आगपेट्या..... अगदी जमिनीचा तुकडासुद्धा विकत घेता येऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना आहे का ?'
                त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला,
'या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही आपापसांत भांडता, वाडवडीलांनी ठेवलेल्या जमिनीसोडून दुसरीकडे जाता. आपलं हे जंगल सोडून शहरात जाता. त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्षे जगलोच ना ? आमचे वाडवडीलसुद्धा जगले. आम्ही देवाची लेकरे . या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहत आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्या मालकीची नाही.इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही. कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही. वारा आमची आज्ञा पाळत नाही. पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी-विक्री आम्ही कोण करणार ?  मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं तुमचं काहीच मालकीचं नाही , तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाचा जोरावर करता ? तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडेल.'
           त्याला कोणत्या शब्दांत उत्तर द्यावं, ते काही मला समजेना. त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशी समजूत होती की माझं ज्ञान त्यांच्या पेक्षा जास्त आहे.
           चलनवाढ आणि घट, राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहीत आहे. इथे या माणसाला कशाचीही माहिती न्हवती. पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता. भूमी, पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकी नसते हे त्याला माहीत होतं.
            मग जास्त सुसंस्कृत कोण ? कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हतारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही ?


वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...