Skip to main content

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी

                    वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाचत होतो.या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे. या अनुभवकथनातील प्रत्येक लेख हा विचार करायला लावणारा आहे. याच पुस्तकातील ६ वा लेख आहे म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा.
                      या लेखातील काही भाग मी इथे आपणाला वाचण्यासाठी देत आहे.या लेखात सुधा मूर्ती आणि त्या म्हताऱ्या माणसांमध्ये झालेला सवांद अंतर्मुख करणारा आहे. विचार मग्न करायला लावणारा आहे.ज्या प्रकारे त्या माणसाच्या बोलण्यानं सुधा मूर्ती विचार मग्न झाल्या त्याच प्रकारे वाचक ही विचार मग्न होतो. सुधा मूर्ती ह्या ओडीसा राज्यातील आदिवासी भागातील एका खेड्यात भेट द्यायला जातात तेव्हा त्यांची त्या गावातील एका म्हाताऱ्याशी भेट होते. त्यांच्यात झालेल्या संवादातून असं कळतं कि भारत देश स्वतंत्र झाला आहे हे भारतातील काही आदिवासी भागातील लोकांना कित्येक वर्ष माहीत न्हवतं.याचं खुप वाईट वाटतं.
                      त्या महाताऱ्याची साधी राहणी, साधं वागणं, साधं बोलणं हे शिकलेल्या लोकांना अंतर्मुख करायला लावणारं आहे.या लेखातील तो संवाद मी जसा चे तसा देत आहे.
                      मला एक म्हतारा माणूस भेटला .मी म्हतारा म्हणते आहे खरी...  पण त्याचंसुद्धा वय नक्की किती असावं, ते सांगणं फार कठीण होतं.आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले, त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशे चार वर्ष असावं.
                      या म्हताऱ्याशी माझं संभाषण चांगलं रंगदार झालं. मी त्याला विचारलं, 'आपल्या देशावर कुणाचं राज्य आहे ?'
                      त्याच्या दृष्टीने 'देश' याचा अर्थ कलाहंडी (या शहरात तो राहत होता) एवढाच होता, हे उघडच आहे.
 त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला. 'तुम्हाला माहीत नाही ? आपल्या देशावर 'कंपनी सरकार'चं राज्य आहे.' त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता 'इस्ट इंडिया कंपनी.'  भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, याची त्या म्हताऱ्याला कल्पना न्हवती.
          मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोकचक्र दाखवलं.
          पण त्यांचा त्याच्यावर काही प्रभाव पडला नाही. ' हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे. त्याच्याकडे पाहून थोडीच कळणार आहे, आपल्यावर कुणाचं राज्य आहे ते ? आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे.'
          इंग्लंडची ती 'गोरिवाली राणी' आता परत गेली आहे व तिचं आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला, पण त्याला काही पटेना.
               आदिवासी जमातीमधे वस्तूंच्या दिवाणीघेवणाची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्वाची असते, याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला. 'हे पाहा, या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण, खूप खूप साड्या, मिठाची गोणी, आगपेट्या..... अगदी जमिनीचा तुकडासुद्धा विकत घेता येऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना आहे का ?'
                त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला,
'या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही आपापसांत भांडता, वाडवडीलांनी ठेवलेल्या जमिनीसोडून दुसरीकडे जाता. आपलं हे जंगल सोडून शहरात जाता. त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्षे जगलोच ना ? आमचे वाडवडीलसुद्धा जगले. आम्ही देवाची लेकरे . या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहत आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्या मालकीची नाही.इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही. कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही. वारा आमची आज्ञा पाळत नाही. पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी-विक्री आम्ही कोण करणार ?  मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं तुमचं काहीच मालकीचं नाही , तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाचा जोरावर करता ? तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडेल.'
           त्याला कोणत्या शब्दांत उत्तर द्यावं, ते काही मला समजेना. त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशी समजूत होती की माझं ज्ञान त्यांच्या पेक्षा जास्त आहे.
           चलनवाढ आणि घट, राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहीत आहे. इथे या माणसाला कशाचीही माहिती न्हवती. पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता. भूमी, पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकी नसते हे त्याला माहीत होतं.
            मग जास्त सुसंस्कृत कोण ? कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हतारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही ?


वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...